मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. राज्यातील पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करावा यासाठी अमित ठाकरे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.
अमित ठाकरेंनी पत्रात नेमकं काय म्हंटलय
महाराष्ट्र पोलिस हा आमचा अभिमान आहे, आणि ते आम्हाला वर्षभर सुरक्षित ठेवण्यासाठी अथक परिश्रम करतात. त्यांचे बलिदान आणि प्रयत्न ओळखून त्यांना योग्य तो पुरस्कार मिळणे आवश्यक आहे. कुठेतरी डाउन द लाइन, आपण विसरलो आहोत, त्यांचेही एक कुटुंब आहे आणि त्यांचे कल्याणही ओळखले पाहिजे.
यंदाचा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन, मी राज्य सरकारला त्यांना दिवाळी बोनस देण्याचे मनापासून आवाहन करतो. ही उदाहरणे पोलिस दलासाठी आनंदाची सुरुवात ठरणार आहेत. त्यांना कळू द्या, त्यांनी आमच्यासाठी केलेल्या कामाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.